अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामस्थांना दिलासा: आमदार केवळराम काळें च्या प्रयत्नाने परतवाडा-सेमाडोह मार्गे रायपूर, हतरू, रुईपाठार आणि काजलडोह बस सेवा पुन्हा सुरू
युवा मेलघाट न्यूज | प्रतिनिधी परतवाडा
परतवाडा. मेळघाटातील दुर्गम भागातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार केवळराम काळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे परतवाडा आगारातून सेमाडोह मार्गे रायपूर, हतरू, रुईपाठार आणि काजलडोहसाठी बंद झालेली बससेवा आज पुन्हा सुरू करण्यात आली.
वास्तविक ही बससेवा 2014 मध्ये केवळराम काळे आमदार असताना सुरू करण्यात आली होती. मात्र त्यानंतर रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे ही सेवा बंद करावी लागली होती. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील ग्रामस्थांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. 2024 मध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर आमदार केवळराम काळे यांनी प्राधान्याने या मार्गाचा सर्वे केला. खराब रस्त्यांची दुरुस्ती करून घेतल्यानंतरच या बससेवांना हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या नवीन सेवेअंतर्गत आता परतवाडा – सेमाडोह मार्गे रायपूर – हतरू – रुईपाठार आणि परतवाडा – सेमाडोह मार्गे रायपूर – हतरू – काजलडोह या दोन मार्गांवर एसटी बस धावणार आहेत. यामुळे विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शुभारंभ प्रसंगी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परतवाडा आगार परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले. “हरित आणि स्वच्छ परिसर” निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.



या प्रसंगी गजानन कोल्हे, अचलपूर तालुकाध्यक्ष समीर हावरे, चिखलदरा तालुकाध्यक्ष आलोक अलोकर, दिनेश चव्हाण, भैय्याल मावस्कर, विजय मांडले, श्रीराम आठवले, अभिषेक राठोड, शैलेश म्हला, यशवंत काळे, संदीप पाचघरे, नितेश राठोर, अमोल जाधव, नितीन चावरे, अविनाश यावले यांच्यासह आगार प्रमुख वासनिक मॅडम, गोडे साहेब आणि महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.








