टिटंबा, बिजूधावडी, सुसर्दा, सावलीखेडा विषबाधा प्रकरण
शिवसेना (उबाठा) ची मागणी: केंद्रीय जेवण व्यवस्था बंद करा, दोषींवर कठोर कारवाई करा
युवा मेलघाट न्यूज
धारणी, २७ जुलै २०२६
धारणी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये सेंट्रल किचनच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या विषबाधेच्या घटनांनंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे. जिल्हा प्रमुख प्रा. प्रफुल भोजने यांनी उपविभागीय अधिकारी महसूल विभाग धारणी यांना २९ जुलै २०२६ रोजी निवेदन देऊन चौकशी करून जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, धारणी तालुक्यातील आश्रम शाळा टिटंबा, बिजूधावडी ,सावलीखेडा येथे जेवणामुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जेवण पुरवण्याची पद्धत चुकीची असल्यामुळे केंद्रीय जेवण व्यवस्था तात्काळ बंद करून प्रत्येक शाळेला स्वतंत्र जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
शिवसेनेने आरोप केला आहे की ठरलेल्या शासकीय दर्जानुसार जेवणाचा दर्जा टिकवण्यात आलेला नाही. त्यामुळे योग्य दर्जा तपासणी व त्या जेवणाची तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय धारणी येथील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत.
मेळघाटातील सर्व आश्रम शाळांमध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थी असल्याने प्रशासनाने याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. प्रत्येक शाळेवर नेमणूक करण्यात यावी जेणेकरून शाळेच्या सर्व बाबींचा दर्जा कायम राखला जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. शिवसेने इशारा दिला आहे की या विषयाची दखल न घेतल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
निवेदन देताना जिल्हाप्रमुख प्रा. प्रफुल भोजने यांच्यासह उपजिल्हा प्रमुख शैलेंद्र मालवीय, तालुका प्रमुख राजू राठोड, शहर प्रमुख दिनेश धनेवार, मा.युवा सेना ता.प्रमुख धारणी पंकज मावस्कर, मा.तालुका संघटक चिखलदरा शिवराज मोर्ले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.








