निवडणुक आचार-संहिता मुळे घोषणा नाही
युवा मेलघाट |
मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत `पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना` ला मान्यता देण्यात आली आहे.
काय आहे योजना?
1. 2 लाखांपर्यंत कर्जमाफी: 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे.
2. नियमित कर्जदारांना बक्षीस: जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर निधी दिला जाणार आहे.
3. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ: या कर्जमाफीचा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून एकूण 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे.
घोषणा कधी झाली?
राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी ही घोषणा केली होती. त्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. समितीने अहवाल सादर केल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
`शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरुपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत` असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले.
पुढे काय?
विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर राज्यात ही कर्जमाफी लागू केली जाणार आहे. सहकार विभाग अटी व शर्तींसंदर्भात परिपत्रक काढणार आहे.













