मेलघाट टॉप न्यूज़ अमरावती अपडेट राष्ट्रीय अपडेट संपादकीय धर्म और संस्कृति लाइफस्टाइल जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल विदेश खेल राशिफल आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

लोकशाहीचा ICU आणि 15 मिनिटांचा सवाल?

---Advertisement---

युवा मेलघाट | अमरावती विधान परिषदेचा आखाडा अचानक ICU चा बेड झाला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या तब्येतीची काळजी प्रत्येक संवेदनशील माणसाला वाटेलच. पण प्रश्न तब्येतीचा नाही. प्रश्न आहे टायमिंगचा, पारदर्शकतेचा आणि लोकशाहीच्या चारित्र्याचा.

पहिला सवाल – ‘टायमिंग’
पाच दिवसांपासून संपर्क तुटलेला उमेदवार, अचानक गायब, आणि ऐन मतदानाच्या तोंडावर ICU मधून न्यूज चॅनेलला मुलाखत. हे योगायोग आहे की रणनीती? अमरावतीच्या मतदाराला हा सवाल पडलाच पाहिजे. कारण उमेदवार आजारी पडू शकतो, पण लोकशाही कोमात जाऊ नये.

दुसरा सवाल – ‘घोडेबाजाराचा’ आरोप
माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी 15 ते 20 कोटींच्या व्यवहाराचा आरोप केला आहे. हा आरोप छोटा नाही. जर हा खोटा असेल तर काँग्रेसने तातडीने कारवाई करावी. आणि जर खरा असेल तर मग हा प्रश्न फक्त काँग्रेसचा नाही. हा प्रश्न निवडणूक आयोगाचा आहे, पोलीस यंत्रणेचा आहे, आणि आपल्या सगळ्यांच्या सामूहिक विवेकाचा आहे. ‘नोटा रिचेबल’ असलेला उमेदवार पाच दिवसात ‘नॉट रीचेबल’ कसा झाला, याचे उत्तर जनतेला मिळालेच पाहिजे.

तिसरा सवाल – ‘पक्षाची जबाबदारी’
उमेदवार निवडताना पक्ष काय पाहतो? निष्ठा, स्थानिक जाण की फक्त ‘वजन’? अमरावती जिल्ह्यात अनेक निष्ठावान कार्यकर्ते असताना बाहेरच्या व्यक्तीवर डाव खेळणे, आणि तोच डाव फसणे, हे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह लावते. पराभव झाला तरी चालेल, पण लढाईतून पळून जाणे, हे कार्यकर्त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

शेवटचा सवाल – ‘आपण’ काय करणार?
आज हर्षजीत देशमुख आहेत. उद्या दुसरा कोणी असेल. जर अशा घटनांवर आपण फक्त ‘व्हायरल व्हिडिओ’ म्हणून हसलो आणि सोडून दिले, तर उद्याच्या प्रत्येक निवडणुकीचा ICU बेड बुक असेल. दामिनी अॅप वीज पडण्याचा अलर्ट 15 मिनिट आधी देते. पण लोकशाहीवर घाला पडण्याचा अलर्ट कोण देणार? तो अलर्ट आपणच व्हायचे आहे. जागरूक मतदार व्हायचे आहे.

लोकशाही ICU मध्ये बातम्यांनी खळबळ उडवली आहे. पण खळबळ तात्पुरती असते. बदल कायमस्वरूपी लागतो. तो बदल मतदाराच्या हातात आहे. उमेदवार रुग्णालयात असो वा मैदानात, लोकशाहीचा श्वास मात्र सुरू राहिलाच पाहिजे. कारण लोकशाही व्हेंटिलेटरवर गेली तर ऑक्सिजन आपल्यालाच द्यावा लागेल.

संपादक – युवा मेलघाट

टीप: हा संपादकीय लेख आहे. यात व्यक्त केलेली मते ‘युवा मेलघाट’ संपादक मंडळाच्या भूमिकेतून आहेत. बातमीतील आरोप-प्रत्यारोपांची शहानिशा संबंधित यंत्रणांनी करावी, ही अपेक्षा.

---Advertisement---
---Advertisement---

दीपक मालवीया ‘दीपश्री’

शब्दों को हथियार नहीं, पुल बनाता हूं - जो जीवन, समाज और मेलघाट जैसी धरती की मानवीय संवेदनाओं को आपस में जोड़ें। मेरी कोशिश है कि हर रचना तथ्य की जमीन पर खड़ी हो और भावना की हवा से छुए। सरल भाषा में लिखता हूं, ताकि बात सीधे दिल तक जाए। Mobile No. +91 7875842661

Join WhatsApp

Join Now

Join Youtube

Join Now

Leave a Comment